//
MAEER's MIT GROUP OF INSTITUTIONS, PUNE (INDIA)

शाळा

  • परिचय
  • प्रवेश प्रक्रिया
  • ठळक वैशिष्ट्ये
  • संपर्क
स्वामी विवेकानंद प्रबोधिनी (मराठी माध्यम), औरंगाबाद (महाराष्ट्र), भारत

परिचय

स्वामी विवेकानंद प्रबोधिनी (मराठी माध्यम) ही मराठी माध्यमिक शाळा असून येथे इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. विदयालयाची स्थापना दिनांक १५ जून, १९९३ रोजी झाली असून महाराष्ट्र शासन मंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. शाळेचा उद्देश एमआयडीसी आणि जवळपासच्या उपविभागातील विदयार्थ्यांना शिक्षण देणे तसेच मूल्य शिक्षण आत्मसात करून सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास घडवणे व आजच्या मुलांना (विदयार्थ्यांना) भविष्यात भारताचे चांगले नागरीक बनविणे हा आहे.

शाळेतील शिक्षक हे शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी मौल्यवान योगदान देतात. सौ. नंदा दराडे यांना महात्मा ज्योतीराव फुले, फाऊंडेशन २०१४-१५ यांच्याकडून राज्य पातळीवर "सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार" प्राप्त झाला आहे. शाळेचा परिसर ५ एकरापेक्षा अधिक आहे, प्रचंड मोठया बांधकाम झालेल्या इमारती, सर्वोत्तम सुविधा, खेळण्यासाठी मोठे मैदान, संगणक शाळा इ. सुविधा विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुरविल्या जातात. ही एक बोर्डिंग शाळा असून विदयार्थ्यांना ने-आण करण्याची सुविधा पुरविली जाते. अभ्यासबाह्य उपक्रम हा अभ्यासक्रमाचाच एक भाग असतो. विदयार्थांना उदयाचे खंबीर नेतृत्व बनविण्यासाठी चांगल्या वाचनाची सवय असावी, असा शाळेचा विश्वास आहे. ही आवड विदयार्थीदशेत आत्मसात करून देण्यासाठी त्याची काळजी आम्ही वेळोवेळी घेत असतो. सुप्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांची विदयार्थ्यांना माहिती दिली जाते किंवा ग्रंथालयामध्ये ती पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शिक्षक विदयार्थ्यांना प्रोत्साहित करतात त्याचबरोबर विदयार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतात. पालक सभा, कार्यशाळा आणि छोटया, छोटया स्पर्धा आयोजित केल्या जातात. आम्ही पालकांना विश्वास देतो कि, त्यांची बहूमुल्य मुले जी ते आमच्याकडे सोपवतात त्यांना शिक्षण देण्याचे महत्वाचे काम आम्ही करतो ही आमची मुख्य जबाबदारी आहे. आमच्या कार्यकारी संचालिका श्रीमती. वृंदा पाठक या दैनंदिन कामकाजही मोठ्या उत्साहाने पार पाडतात. ११०० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.

प्राचार्याचे नाव

principle details

श्री. प्रवीण पाटील

  • +९१८४०८८४५५६/(०२४०)-२४८४२१५/२४८४५२०
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
  • पी ५ एमआयडीसी विभाग, चिखलठाणा, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत.

औरंगाबाद कॅम्पस

  • निवासी/अनिवासी शाळा:निवासी आणि अनिवासी शाळा या दोन्ही सेवा उपलब्ध

प्रवेश प्रक्रिया

इयत्ता वय निकष आवश्यक दस्तऐवज ऑनलाईन प्रक्रिया / मॅन्युअल प्रक्रिया शुल्क परतावा
पहिली ६ वर्ष जन्माचा दाखला मॅन्युअल प्रक्रिया -
दुसरी ते चौथी ७ ते ९ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र मॅन्युअल प्रक्रिया -
पाचवी ते सातवी १० ते १२ वर्ष टी.सी., जात प्रमाणपत्र मॅन्युअल प्रक्रिया -

ठळक वैशिष्ट्ये

शारीरिक सुविधा:

    • प्रकाशित, हवेशीर, मोठे प्रशस्त वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत.
    • उत्कृष्ट ग्रंथालयाची सुविधा पुरविले जाते.
    • संगणकिय प्रयोगशाळा, संदर्भीत काम, व्यायामशाळा, वैयक्तिक सुसज्ज प्रयोगशाळा, गणिताच्या अभ्यासासाठी खोली, सामाजिक अभ्यासाची खोली, संसाधने (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि घर विज्ञान) इ. ग्रंथालयासाठी विशेष खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात.
    • क्रिकेट, टेनिस, बास्केटबॉल आणि फुटबॉल, खो-खो, भडिमार चेंडू, कबड्डी इ. मैदानी खेळाची सुविधा पुरविले जाते.
    • व्यायामशाळा आणि अंतर्गत खेळाची खोली.
    • प्रथमोपचार कक्ष.
    • दृकश्राव्य खोली.
    • परिसंवाद आणि विचारविनिमय कक्ष.
    • सभागृह सुविधा.

अध्यापक:

    • पात्र आणि प्रशिक्षित शिक्षक त्यासोबत पुरेसे सुरक्षितता त्यामुळे समन्वय व अनुभवात्मक शिक्षण प्रदान केले जातात.
    • नाटक आणि भाषण उच्चार, सल्लागार म्हणून व्यावसायिक समुपदेशक आणि व्यवसायामध्ये सर्वागीण, संगणक प्रशिक्षक, रंगमंच आणि कला शिक्षक, (घरातील आणि मैदानी खेळ आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षण ). इ. साठी विशेष शिक्षक नेमले जातात.
    • सर्वोत्तम शिक्षक आकर्षित करण्यासाठी त्यांना उत्कृष्ट वेतन दिले जाते
    • शिक्षकांची देखील वैयक्तिक प्रगती करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा यातून विषयाची सामग्री आणि कौशल्य घडविण्यासाठी कार्यशाळा सुधारणा व तसेच त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी संधी दिल्या जातात.
    • करिअर वाढ आणि नोकरी संपन्नता.
    • व्यवस्थापनात सहभागी होऊन त्यांच्या स्वाभिमान आणि स्वमुल्य विकसित करणे आणि संस्थात्मक जबाबदारी आणि मालकी गृहीत करणे.

विद्यार्थी :

  • शाळेच्या जागेपासुन सुमारे (५ किमी . पर्यंत) विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
  • वर्गातील विद्यार्थ्याची संख्या जास्तीत जास्त ५०. आणि विद्यार्थ्याची संख्या व शिक्षक यांचे गुणोत्तर २५: १ (कमाल) किंवा त्यापेक्षा कमी ठेवली जाते .
  • विद्यार्थ्यांना स्वत:चा अभ्यास करण्यासाठी जरुरीपेक्षा जास्त संधी दिल्या जातात; पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणात सहभागी आणि परस्पर भागीदार करता येईल अशी अपेक्षा करता येते. पालक समित्या, आणि इतर सक्रिय सहभागात पालकांना सहभागी होण्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.

अभ्यासक्रम :

  • शाळा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शाळा माध्यमिक परीक्षांसाठी सर्वपरीने तयार करते.
  • पूर्व- प्राथमिक अभ्यासक्रमाची सुविधा.
  • दररोज मुलांना प्राथमिक इयत्तेपासून इयत्ता दहावी पर्यत अभ्यासाचे दडपण न येऊ देत तो कसा पूर्ण होईल याचा प्रयत्न केला जातो.
  • अभ्यासक्रम मुलांच्या सर्वागीण विकासासाठी प्रोत्साहन देणारा असा असून प्राथमिक, पूर्व प्राथमिक वर्गापासून विद्यार्थामध्ये समन्वय साधणारा असा आहे. माध्यमिक वर्गामध्ये प्रकल्प व संशोधन यावर अवलंबित अभ्यासक्रमावर भर दिला जातो. अभ्यासक्रम हा एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वाढणारा असा असून तो नैसर्गिकरित्या वयाच्या विकासाप्रमाणे वाढविणारा आहे.

संपर्क

  • स्वामी विवेकानंद प्रबोधिनी,औरंगाबाद (मराठी माध्यम)
    पी ५ एमआयडीसी विभाग, चिखलठाणा, औरंगाबाद - ४३१००६.
  • +९१०२४०-२४८४२१५/२४८४५२०
  • This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.